मुख्य सामग्रीवर वगळा

६८ वर्षांच्या आज्जी नी सर केला हरिहर गड.तरुणांना लाजवेल असे काम

 इच्छा तेथे मार्ग हे वाक्य अनेकदा तुमच्या कानी पडलं असेल. ट्रेकिंग वैगैरेचं प्रमाण तरूण पीढीमध्ये सगळ्यात जास्त दिसून येतं. ट्रेकिंगसाठी सर्वात कठीण समजला जाणारा नाशिकचा हरिहर गड, ट्रेकर्समध्ये विशेष प्रसिद्ध आहे. हाच गड नाशिकमधल्या ६८ वर्षांच्या आजींनी सर करून दाखवला आहे. विशेष म्हणजे आजींसोबत, त्यांच्या नातवानेही हा अवघड गड सर केला. हरिहर गड सर करणाऱ्या नाशिकच्या या आजींचे नाव आशा अंबाडे असून नातवाचे नाव मृगांश आंबाडे आहे.

समुद्रसपाटीपासून ३ हजार ६७६ फूट उंच असलेला हरिहर गड ८० अंशांच्या कोनात आहे. त्यामुळे हा त्रिकोणी गड सर करणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. सोशल मीडियावर कालपासून या आजींचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.सोशल मीडिया युजर्सनी या आजींच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आजींसह चिमुरड्यानेही किल्ला सर केल्यामुळे त्याचंही नेटिझन्स कौतुक करत आहेत.

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या अंबाडे कुटुंबातील सर्वांनाच ट्रेकिंगची आवड असल्यानं, घरातला प्रत्येक जण ट्रेकिंगला जातो. त्यातूनच यावेळी आशा अंबाडे आजींसोबत हरिहर गड सर करायचा निश्चय अंबाडे कुटुंबाने केला आणि तसे प्रयत्न सुरू झाले. आजींची इच्छाशक्ती आणि फिटनेस पाहता हा गड सहज सर करू शकतील असा विश्वास कुटुंबातील लोकांना होता. अखेर आजींनी किल्ला सर करूनच दाखवला

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महानुभवांचे तीर्थक्षेत्र आष्टी चे कृष्णमंदिर

              महानुभव पंथाचे श्री चक्रधर स्वामी १२व्या शतकात भारत भ्रमंती करत असताना  गावोगावी उपदेश करत आणि रात्री त्या गावी मुक्कामास राहत. चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी मुक्कामास राहिले ते स्थान आज पंथाचे अनुयायी पवित्र स्थळ मानतात. असेच फिरत असताना चक्रधर स्वामी आष्टी या गावी आले आणि रात्री आष्टी चे त्या काळी असलेले पाटील हरीचंद्र पाटलांच्या वाड्यावर मुक्कामास राहिले. आज हे ठिकाण महानुभव पंथाचे पवित्र असे ठिकाण आहे.              येथील पाटील असलेले निवृत्ती पवार यांनी त्यांचा वाडा आणि जागा मंदिर बांधण्यासाठी उपलब्ध करून दिले.   मंदिराचे बांधकाम हे दगडी आहे .२०१० सा ली शासनाचा विकास निधी प्राप्त झाला आणि मंदिराचे बांधकाम झाले. मंदिरात भक्तनिवास, मंदिरास कंपाऊंड इत्यादी कामे करण्यात आली. भक्तांचे येथे कायमच येणे जाणे असते. कृष्ण जन्माष्टमी ला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आष्टीतील प्रसिद्ध पिंपळेश्वर महादेव मंदिर

             आष्टी येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर, हे खुप पुरातन असे मंदिर असून पूर्ण पणे दगडी बांधकाम केलेले आहे .         मंदिराच्या समोर जुने पिंपळाचे झाड असून यावरूनच मंदिराला पिंपळेश्वर असे नाव पडले आहे जाणकार  सांगतात .        मंदिराच्या समोर निजाम कालीन जल कुंड आहे याच्या भिंतीचे बांधकाम दगड आणि चुन्यात केलेले आहे. मंदिरात जुनी महादेवाची पिंड आहे. भक्तांची येथे कायमच गर्दी असते. तसेच महाशिवरात्री ला येथे दरवर्षी यात्रा भरत असते.          पाहण्यास असे उत्तम स्थळ आहे. यावर्षी भरपूर पाऊस असल्याने तलाव ओसंडून वाहत आहे.

गडभ्रमंती

  कोल्हापूर :   पाठीवर सॅक, पायात बूट अन्‌ अंगावर घामाच्या धारा घेऊन गड सर करायचा. गडाची माती कपाळाला लावायची. तिथल्या वास्तूंवर नजर टाकायची. बाराबंदीचा पोशाख अंगावर चढवायचा. डोक्‍यावर फेटा बांधायचा. पाठीला ढाल अडकवायची अन्‌ कपाळाला चंद्रकोर लावून मावळ्याच्या वेशात गड धुंडाळायचा. या वेगळ्या छंदातून कोल्हापूर जिल्ह्यातील चार इतिहासवेड्या युवकांची वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली आहे. गडभ्रमंतीतून 'हिस्टॉरिकल टच' फोटो काढण्याचा त्यांचा छंद 'आम्हीच ते इतिहासवेडे'चा संदेश देऊ लागला आहे. सुजीत जाधव, स्वप्नील नाळे, योगेश रोकडे व अाप्पासाहेब रेवडे ही या तरुणांची नावे. सुजीत जाधव सुजीत जाधव मूळचा कसबा बावड्यातला.सह्याद्री प्रतिष्ठानचा सदस्य. मर्दानी खेळात तो तरबेज आहे. विशेषत: दुहाती पट्टा फिरविण्यात त्याचे कौशल्य आहे. शंभराहून अधिक किल्ले त्यांने पालथे घातले आहेत. गडावर जाताना तो बाराबंदी पोशाख, ढाल, कडे, कवड्याच्या माळा घेऊनच जातो. रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या पालखी सोहळ्यातही त्याचा सहभाग असतो. स्वप्नील एकनाथ नाळे सांगरूळ ब्रॅंडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वप्नील एकनाथ नाळे या...